Search for:
tulsi vivah

तुळशी लग्न

एकदा शंकराने अपले तेज समुद्रात फेकून दिले.त्यातून एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला जो मोठेपणी जालंधर नावाचा पराक्रमी दैत्य राजा बनला. ह्याच्या राजधानीचे नाव देखील जालंधर नागरी होते. जालंधरच्या अत्याचारांना सर्व ऋषि-मुनि, देवता आणि मनुष्य वैतागले होते.


दैत्यराज कालनेमीने आपल्या कन्येचा वृंदाचा विवाह जालंधशी करून दिला. जालंधरची पत्नी वृंदा अत्यन्त पतिव्रता स्त्री होती. तिच्या ह्या पतिव्रता धर्माच्या शक्ति मुळेच जालंधर ना कधी मारला जात असे, ना कधी पराजित होत असे. त्यामुळे जालंदरचा नाश करण्यासाठी वृंदाच्या पतिव्रता धर्माचा भंग करणे अत्यावश्यक होते.


त्यासाठी विष्णुने जलंधरचे रूप धारण केले आणि वृंदाला स्पर्श केला, ज्यामुळे तिचे सतीत्व भंग झाले। त्याच वेळी स्वर्गात युद्ध करत असलेल्या जालंधर हरला व युद्धात मरण पावला.


जेंव्हा वृंदाला ह्या कारस्थाना बद्दल समजला, तेंव्हा क्रोधीत होऊन विष्णूला हृदयहीन शिळा होण्याचा श्राप दिला. विष्णूने आपल्या भक्ताचा श्राप स्वीकारला व शाळीग्रामचा दगड बनले. जेंचा सृष्टीचा पालनहार दगड बनला तेंव्हा ब्रह्मांडाचे संतुलन बिघडू लागले. त्याचा समतोल पूर्ववत करण्यासाठी सर्व देव गणांनी वृंदा कडे प्रार्थना केली कि तिने विष्णूला श्रापातून मुक्त करावे. त्याच्या विनंतीचा मान राखत तिने विष्णूला मुक्त केले आणि स्वतः सती गेली. त्याजागी नंतर तुळशीचे रोप उगवून आले.


तेंव्हा विष्णूने वृंदाला सांगितले कि तुझ्या सतीत्वामुळे तू मला लक्ष्मी पेक्षा ही अधिक प्रिय झाली आहेस. आता तू तुळशीच्या रूपाने सदैव माझ्या जवळ राहशील. तेंव्हा पासून दार वर्षी कार्तिक महिन्याच्या द्वादशीला तुळशीचे लग्न शाळीग्राम रुपी विष्णू देवाशी लावले जाते. ह्या वर्षी तुळशी विवाह १५ नोव्हेंबर द्वादशी पासून १९ नोव्हेंबर पौर्णिमे पर्यंत साजरा केला जाणार आहे.

Contact

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Home Address

Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn