Search for:

गुण मिलन आणि वैवाहिक सौख्य

हल्ली उच्च शिक्षण आणि मग नोकरी /व्यवसाय मध्ये स्थिरावण्यास लागणारा वेळ ह्यामुळे बहुतेक मुलांचे त्यातही मुलींचे लग्नाचे वय हे २७-२८ च्या पुढे असते. स्वाभाविकच संसारातील इतर गोष्टींनाही उशिराच सुरवात होते.


लग्न ठरवताना सुखी संसाराच्या सुरवातीसाठी रक्त गट, रक्त विकार, अंडाशयाची चाचणी, वंध्यत्व (infertility), अनुवंशिकता, लैंगिक संक्रमित रोग, HIV अश्या अनेक वैद्यकीय चाचण्या करून घेतात. हे सर्व काही मुलांना आधुनिक वाटते, त्यामुळे जर कोणी त्यांना कुंडली जुळवून पहायला सांगितले की ते म्हणतात “आमचा ह्यावर विश्वास नाही, आम्ही मेडिकल टेस्ट करणार आहोत ते सायंटिफिक आहे…”


यशस्वी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी दांपत्य हे एकमेकांना वैचारिक, शारीरिक आणि मानसिक रित्या पूरक असावे लागते. त्यासाठीच ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास पूर्वक विचार करून नवं दांपत्यांसाठी काही सिद्धांत व नियम आखून दिले आहेत. ज्याला आपण वधू-वर गुण मिलन म्हणतो.
ज्या गोष्टी आजकाल हजारो रुपयांच्या टेस्ट करून सांगितल्या जातात, त्याच गोष्टी ज्योतिषी वधू-वरांची कुंडली पाहून व त्यांचे गुण मिलन अभ्यासून सांगू शकतात. गुण मिलनामध्ये आपण ज्यागोष्टी अभ्यासतो त्या ह्या पेक्षाही जास्त काही सांगतात.


* नाडी: दांपत्याची प्रजनन क्षमता व दर्जा दर्शवते. एक-नाडी दोष आल्यास संतती सुखात अडथळे किंवा त्या सुख पासून वंचित राहण्याचे योग्य येऊ शकतात. हे आजच्या काळात वंध्यत्वची (infertility) व अंडाशयाची चाचणी करून सिद्ध केले जाते.


* योनी: जोडीदार जसा वैचारिक व मानसिक रित्या पूरक असावा तसाच शारीरिक दृष्टीने हि पूरक असणे हे वैवाहिक जीवनासाठी अतिशय महत्वाचे आहे. आणि हे गुण मिलनातील योनी हे सूत्र योग्य रीतीने पडताळते.


* गण: जोडीदाराचे वैचारिक सुसंगती किती आहे हे दर्शवते.
हे आणि अजून काही घटक आहेत ज्याला अष्टकूट म्हणतात, हे गणिती स्वरूपाने जोडी एकमेकांसाठी किती योग्य आहे हे दर्शवतात.


ह्या बरोबर वधू-वरांची कुंडली अभ्यासून त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा आढावा घेता येतो, आरोग्या संबंधित धोका, आयुर्मान, स्वभाव, व्यसन, करियर आणि अनेक बाबतीत आपल्याला समोरच्याचा अंदाज घेता येतो. जर त्यांच्या पैकी एखाद्याच्या नशिबी संसार सुख कमी असेल किंवा त्यात अडथळे असतील तर हे हि आपल्याला कुंडली वरून समजते.


आज हजारो वर्षे ह्याच पद्धतीने लग्नसाठी मुलां-मुलींचे गुण जुळवले जात आहेत ते परंपरा म्हणून नव्हे, तर अभ्यासपूर्वक मांडलेला सिद्धांत म्हणून. आज ह्याच विचारांना आधुनिक सूत्रांची साथ मिळाली असली तरी, ती आपल्या शास्त्राने त्याही पेक्षा खूप खोलवर अभ्यास करून, अधिकाधिक घटकांच्या सूत्रांची मांडणी सामान्य व्यक्तीलाही समजेल अश्या स्वरूपात मांडली आहेत.


ह्याचा अर्थ हा नव्हे, की कुंडली आणि गुण जमले, म्हणजे त्या दाम्पत्याचे जीवन एकदम सुखमय आणि निर्दोष असणार आहे. ह्यातून आपण हा बोध घ्यायचा आहे की, आधुनिक वैद्यकीय चाचणीतून फक्त आरोग्याची पूरकता कळते पण वेदिक सूत्रानुसार आरोग्या बरोबर वैचारिक, शारीरिक आणि मानसिक योग्यताही पडताळणे आवश्यक आहे व फायद्याचेही.
कर्म सिद्धांत नुसार प्रत्येकाच्या नशिबात जे मांडले आहे ते त्यानुसारच होणार, पण जोडीदार निवडताना आपण मात्र दक्षता घ्यावयाची आहेच, बाकी सर्व परमेश्वराच्या स्वाधीन!

Contact

Home Address

Phone No. : 91+ 749 9846 591

Email: mrunal@vedikastrologer.com

Address: Plot D-2, Telco Soc no 14, Sector 24, Kanch ghar chowk, Pradhikaran, Nigdi, Pune 411044

Office Address

Address:  Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.

Services

Connect Us

Follow by Email
Facebook
Instagram
LinkedIn
LinkedIn

Map

Disclaimer: Astrological services are based on information given by clients and the Astrologer (author) is not liable and responsible for any correctness of analysis or any loss occurred due to the analysis as the same is given basis on the planet status as of the day of prediction.