भाग सहा गण कूट गुण मिलन
गण कूट हे अष्टकूटाचे 36 गुणां पैकी सहा गुण कुणाचे योगदान देते. एकूण तीन गण असतात देव-गण, मनुष्य-गण आणि राक्षस-गण. प्रत्येक नक्षत्राला एक गण दिलेला आहे. 27 नक्षत्रां पैकी नऊ नक्षत्रे देवगण, 9 मनुष्य गण, आणि नऊ राक्षस गणात मोडतात. प्रत्येक व्यक्तीचा गण हा त्याच्या जन्म कुंडलीतील जन्म नक्षत्रास दिलेल्या गणावर अवलंबून असतो.
देव गण: देव गणाच्या व्यक्ती नम्र, उदार, सहृदय आणि प्रामाणिक असतात. ह्या व्यक्ती रीती-रिवाज पाळतात आणि परोपकाराची भावना बाळगतात. ह्या व्यक्ती वाद-विवाद व कलह यापासून दूर राहणे इष्ट समजतात, मत्सर भावनेपासून पासून दूर राहतात.
मनुष्य गण: मनुष्य हा स्वार्थी असतो आणि भौतिक सुखाने घेरलेला असतो. यामुळे मनुष्य गणाची व्यक्ती संमिश्र स्वभावाची असते. कधीकधी अतिशय दयाळू, नम्र असते, पण कधी तीच व्यक्ती अत्यंत असभ्य आणि वृक्ष स्वभाव दर्शवते. ही व्यक्ती धार्मिक आणि कलात्मक पण असते. या व्यक्तींबाबत असे कुठलेही प्रमाणे देता येत नाही कि, ते सर्व जीवन नियमांचे पालन करतीलच.
राक्षस गण: राक्षस गणातील व्यक्तींचे व्यक्तिमत्व सामान्यतः हा गूढअसते. या गणाच्या व्यक्ती अत्यंत स्वार्थी, हट्टी आणि कठोर स्वभावाचे असतात. या व्यक्ती प्रतिभावान ही असू शकतात, पण भांडण उकरून काढण्याची प्रवृत्ती असते. वरील सर्व गुण असलेल्या व्यक्ती वाईट स्वभावाचीच असेलच असे नाही.
पुढील तक्त्या नुसार आपण वधू-वरांचे गण जुळवून पाहू शकतो
देव आणि मनुष्य गणाच्या व्यक्तींमध्ये गुण विशेष यांमध्ये काही प्रमाणात समानता असते, आणि ते एकमेकांना पूरक असतात. यामुळे देव आणि मनुष्य गणाची जोडी शुभ मानली जाते. राक्षस गणाच्या व्यक्तींचे स्वभाव गुण, देव आणि मनुष्य गणाच्या व्यक्तींशी जुळत नाहीत किंवा आपण असेही म्हणू शकतो की ते विरोधी गुण आहेत.
या कारणाने राक्षस गणांचा मनुष्य किंवा देव गणा बरोबर जोडी जुळवणे अशुभ मानले जाते. वधू आणि वर यांचे व्यक्तिमत्व खूप विरोधी असू शकते, अशावेळी या गण कूट दोषाचायाचा परिणाम म्हणून वैवाहिक जीवन हे क्लेशदायक किंवा त्रासदायक असू शकते. कालांतराने त्याचे रूपांतर कडाक्याची भांडणे, मानसिक दुरावा किंवा लग्न मोडण्या पर्यंत ही जाऊ शकते.
प्रत्येक प्रकारचा गण जेव्हा त्याच प्रकारच्या गडाशी जुळवला जातो तेव्हा त्याला पूर्ण गुण म्हणजेच 6 गुण प्राप्त होतात. उदाहरणार्थ: देव-देव किंवा मनुष्य-मनुष्य किंवा राक्षस-राक्षस याप्रमाणे जुळवले जातात. जर वधू मनुष्य गणाची असेल आणि वर हा देव गणाचा असेल तरीही पूर्ण 6 गुण मिळतात.
पण वधू देव गणाची आणि वर मनुष्य गणाचा असेल तर त्यांना 5 गुण मिळतात. वधु आणि वर त्यांच्या पैकी एक जण राक्षस गण असेल आणि दुसरे देव गण असेल तर त्यांना सहा पैकी फक्त 1 गुण दिला जातो.
जर वर राक्षस गणाचा असेल आणि देव अथवा मनुष्य गणाची वधू असेल, तर त्यांचे गुणमिलन केल्यास त्यांना एकही गुण दिला जाणार नाही, म्हणजेच शून्य गुण मिळतात. परंतु वधु राक्षस गणाची आणि वर ही राक्षस गणाचा असेल तर त्यांना पूर्ण 6 गुण मिळतात.
या गण कूट दोषा करिता विवाह रद्द करावा का? गण कूट दोषांमुळे वैयक्तिक जीवनातील आवड निवड, व्यावहारिकता, विचार पद्धती आणि इतर विशेष गुणांमध्ये भिन्नता असण्याचे संकेत आहेत. यामुळे दाम्पत्य जीवनात निराशा, मतभेद, वाद विवाद निर्माण होण्याची शक्यता असते. थोडक्यात गण कूट दोष असेल तर दांपत्याचे वैवाहिक जीवन शांततामय आणि सामंजस्याचे असणे कठीण आहे असे म्हणता येईल.
Contact
Phone No. : 91+ 749 9846 591
Email: mrunal@vedikastrologer.comOffice Address
Address: Vision Plus, Datta Nagar Rd, Block B6, Datta Nagar, Transport Nagar, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044.
Home Address
Address: Swasti
MQ5C+QX8, Sector No. 24, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411044
Blogs
Copyright © 2026 Vedik Astrologer | Powered by MI Tech Solutions






